मुंबई : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली होती त्यावेळी राज ठाकरे भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर आज (९ एप्रिल) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
यावेळी बोलत असतांना ‘रेल्वेलगतच्या जागांवर असलेली घरं तोडण्याबाबत रेल्वे प्रशासन नागरिकांना वारंवार नोटिसा बजावून त्रास देत असल्याचा मुद्दा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी व्यक्त केले. काही महत्वाचे रेल्वे प्रकल्प तसेच रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य आदी महत्वाच्या विषयांबाबतही ठाकरेंनी यावेळी काही महत्वाच्या सूचना केल्या.
दरम्यान, यावेळी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील तसंच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात दरोडा, तब्बल २.४ कोटींचा मुद्देमाल लंपास
- ‘त्या’ घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया; म्हणाले,“सुरक्षेतील त्रुटींची…”
- “आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!
- “नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल


