🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावन फलंदाज तयार झाले आहेत. यातील अनेक फलंदाजांची पहिली पायरी देशांतर्गत क्रिकेट राहिली आहे. सध्या रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सुवेद पारकरने धमाकेदार फलंदाजी करत दिग्गजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या या खेळाडूने दुसऱ्या दिवशीच्या खेळात १५० धावांचा टप्पा पार केला.
रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई संघाचा सामना उत्तराखंडशी खेळायला जात आहे. मुंबईने सोमवारी ६ जून रोजी पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉने लवकर विकेट गमावली तर यशस्वी जैस्वालही ३५ धावा करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सुवेदने अडचणीत सापडलेल्या मुंबईसाठी दमदार खेळी खेळली. अरमान जाफरसोबत त्याने संघाची धुरा सांभाळली आणि पदार्पणातच शतक झळकावले.
या फलंदाजाने १२३ चेंडू खेळून आपल्या रणजी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने आणखी संयमाने फलंदाजी करत २०६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सुवेदने सरफराज खानसोबत २६७ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ४५० च्या जवळ नेली. २९० चेंडू खेळल्यानंतर सुवेदने कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात १५० धावांचा टप्पाही पार केला.
A ton on #RanjiTrophy debut! ???? ????
Sit back & relive how Mumbai batter Suved Parkar scored an unbeaten hundred on Day 1 of the #QF2 against Uttarakhand. ???? ???? @Paytm | #MUMvCAU | @MumbaiCricAssoc
Watch ???? ????https://t.co/dgPAEzLbUb pic.twitter.com/Fs34pzXP5f
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 6, 2022
रणजी करंडक बाद फेरीत पदार्पणातच शतक
रणजी करंडकच्या बाद फेरीत पदार्पणात शतक झळकावणारा सुवेद हा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी 1939 मध्ये बंगालचा फलंदाज बासिल माल्कोमने मद्रासविरुद्ध पदार्पणात शतक झळकावून इतिहास रचला होता. यानंतर २०१७ मध्ये तामिळनाडूविरुद्धच्या बाद फेरीत मुंबईकडून पदार्पण करताना पृथ्वी शॉने याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. आता या यादीत आपले नाव कोरण्यात सुवेदलाही यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
