🕒 1 min read
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना कोर्टाकडून हनुमान चालीसा प्रकरणी दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाच पठण करणार असल्याची धमकी राणा दाम्पत्य यांनी दिली होती.
राणा दाम्पत्य यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखलः
दाम्पत्याने दिलेल्या धमकीमुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांची जामीन वर सुटका करताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला अनेक अटी घातल्या होत्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत कुणाशीही संवाद न साधण्याची न्यायालयाने अट घातली होती.
राणा दाम्पत्यला दिलासाः
दरम्यान, या अटीचे उल्लंघन केल्यामुळे राणा दाम्पत्य यांना जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज करून केली होती. खटल्याच्या गुणवत्तावर परिणाम होत नसेल तर न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, असं म्हणत विशेष न्यायालयाने जामीन रद्द करण्याचा सरकारचा अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाने सोमवारी हा अर्ज फेटाळला असल्यामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena । घोडा मैदान लांब नाही, तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या; शिवसेनेचा भाजपाला टोला
- Ambadas Danve | वॉर्ड रचना बदलावर अंबादास दानवेंची प्रतिक्रीया
- Pooja Sawant | अभिनेत्री पूजा सावंतला करायचे आहे ‘या’ अभिनेत्रीच्या बाॅयफ्रेंडशी लग्न
- Aditya Thackeray | राज्यातील हिंदुत्वाचे सरकार अफजल खानाच्या देखाव्याला नाकारते कसे?- आदित्य ठाकरे
- Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे एकनाथ राहावं, ‘ऐक’नाथ होऊ नये; धनंजय मुंडेंची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
