Share

NCP | औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं – सुरज चव्हाण

Published On: 

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. आगामी  निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून त्यांचा हा दौरा आखण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यावरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र काबीज करायला आलेल्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रातच आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं, असं ते म्हणाले.

“बारामतीचा बुरुज ढासळण्यासाठी दिल्लीवरून मोदी-शहा आले परंतु आमचा बुरुज ढासळू शकले नाहीत. ज्यावेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांनी केला तेव्हा त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलंय. असंच स्वप्न घेऊन महाराष्ट्र काबीज करायला आलेल्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रातच आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा योग्य तो पाहुणचार करून परत पाठवण्याची व्यवस्था बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता नक्की करेल.”, असा इशाराच सुरज चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!