मुंबई : एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा शिंदे गट, असे दोन गट पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप, टीकेबाजीही करतायेत. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, असं नेमकं काय झालं ज्यामुळे शिवसेना पक्षामध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली. अशातच याचसंदर्भात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले रामदास कदम ?
शिवसेनेची ताकद असती, तर 50 आमदार आणि 12 खासदार आपल्याला सोडून गेले नसते, असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते.राष्ट्रवादीतून भाड्याने आणलेल्या लोकांना नेते, उपनेते बनवून आमच्या अंगावर सोडलं जात आहे. त्याची सर्व उत्तर उद्याच्या मेळाव्यात मिळतील, असंही रामदास कदम यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार की, एकनाथ शिंदे यांच्या?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव
- Ambadas Danve । “… पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी हे करावेच लागेल”; दानवेंचा शिंदेंना सल्ला
- Ajit Pawar | “एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीसांकडे सहा जिल्हे म्हटल्यावर…” अजित पवार
- Ajit Pawar | “मी पण आईला भेटतो पण फोटो काढत नाही”, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
- MNS । ‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार


