Share

“आमदारांना खिरापती वाटल्यासारखं घर वाटणे म्हणजे…”, राम सातपुतेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

Published On: 

मुंबई: राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आता यावरच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनीही ठाकरे सरकारवर ट्वीट करत निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडायची आणि आमदारांना खिरापती वाटल्यासारखं घर वाटायचा निर्णय म्हणजे या सरकारच शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखं आहे. आमदारांना घर देऊन खुश करायचा केविलवाणा प्रयत्न हे जुलमी ठाकरे-पवार सरकार करत आहे. अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!