मुंबई : महाराष्ट्रात भाजपचे तीनही राज्यसभेचे उमेदवार विजयी झाले आहेत. सहा जागांसाठी निवडणूक झाली ज्यामध्ये भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार असे सात उमेदवार रिंगणात होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
“गेम प्लॅनिंगमध्ये आम्ही मागे राहिलो, तर गेम प्लॅनिंगमध्ये देवेंद्र फडणवीस विजयी झाले. भाजपने संपूर्ण निवडणूक नियोजनानुसार लढवली आणि आम्ही त्यांच्या गेम प्लॅनमध्ये अडकलो. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही चारही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज वर्तवला होता. काय चूक झाली याचा अभ्यास करून निश्चितपणे विश्लेषण केले जाईल.”
महाविकास आघाडीचे संजय राऊत (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढ़ी (काँग्रेस) विजयी झाले आहेत. पहाटे ४ वाजता जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा मोठा पराभव झाला. कोल्हापूरचे माजी खासदार महाडिक आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवार यांच्यातच लढत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते.
महत्वाच्या बातम्या :


