कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आहे. २ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशातच पश्चिम महाराष्ट्रात खास दबदबा असणारे शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोणाला पाठींबा देणार याकडं सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. आता, राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटाला म्हणजेच महाडिक-पी एन पाटील यांच्या गटाला जाहीर पाठींबा दिला असून या गटाचं पारडं आता जड झालं आहे. यामुळे कोल्हापुरातील महाविकास आघाडीतील नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.
‘गोकुळने लॉकडाऊन काळातही दूध उत्पादकांना सांभाळून घेतलं. तसंच आमचा गोकुळ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर सत्ताधारी गटाला पाठिंबा देत आहे,’ अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’


