नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज हजारो नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. अशात केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले. तर कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती.
देशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.
ये मानवता के खिलाफ है
ये अपराध भी है।
अंतिम संस्कारों का ये अन्तहीन सिलसिला अहंकारी शासकों के पत्थर दिली का सबूत है।
अपने ही लोगों की लाशों की बुनियाद पर सरकार मजबूत नहीं हो सकती।
ये तस्वीरें और घटनाएं मोदी सरकार को जीवन भर पीछा करेगी।#COVID19 #CovidIndia pic.twitter.com/4rxK8h6nth
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 28, 2021
रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अंहकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी टीका ही त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

