Share

राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द मात्र न्यायालयात हजर राहावं लागणार !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वाशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाका फोडला होता. हा टोलनाका फोडण्यास राज ठाकरे यांचं २६ जानेवारी २०१४ रोजीचं प्रक्षोभक भाषण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी हा टोलनाका बंद करण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनसेच्या गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता.

दरम्यान, या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की नाही, हे महत्वाचं आहे. मनसे आणि आंदोलन यांचं वेगळंच समीकरण आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून आपल्या स्टाईलने आंदोलन करत असते. यात अनेकवेळा मनसैनिकांवर गुन्हा दाखल होतो. त्यांच्यावर न्यायालयीन खटले देखील चालतात. वीजबिल, ऍमेझॉन प्रकरणी नुकतंच खळ-खट्याक केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!