🕒 1 min read
दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 26 जानेवारीच्या रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी असं आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी केल होतं.
आता दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिसांसाठी एक संदेश प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 26 जानेवारी रोजी झालेल्या घटनेत आपण जो संयम दाखवला आहे त्याबद्दल तुमचे आभार. आपल्याकडे संपूर्ण शक्ती होती तरीपण आपण समजदारी दाखवली. आपल्या या संयमतेमुळे आपण या आंदोलनातून बाहेर आलो आहे. आपण अशा अनेक घटनांचा सामना करत आलोय. शेतकरी आंदोलनात जो हिंसाचार झाला त्यामध्ये आपले 394 पोलिस जखमी झाले आहेत. सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा उपचार मिळत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की, पुढील काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यासाठी आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. मी आपल्या शांततेबद्दल आपले आभार मानतो.
Delhi police commissioner writes to Delhi Police staff. His letter reads, "You showed great patience despite the farmers' agitation turning violent…394 of our friends were injured in the violence & some are in hospital. I met some of them, they are being given proper treatment" pic.twitter.com/8qcgWPZN4q
— ANI (@ANI) January 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे मोठे यश; देशातल्या थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ प्रचंड वाढला
- तृप्ती देसाई यांच्या विरोधात बाह्मण महासंघाचे पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
- तेरा वर्षीय मुलीसोबत लग्न, नवरदेवाविरोधात पॉक्सोचा गुन्हा
- ‘या’ दोन मोठ्या शेतकरी संघटनांनी घेतली आंदोलनातून माघार
- बीड जिल्ह्यात मृतांचे नावे विहिरी दाखवून २० कोटींचा डल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

