Share

“राज ठाकरे दोन-चार महिने भूमिगत होतात आणि…”; शरद पवारांनी काढला चिमटा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,‘बरेच वर्ष राज ठाकरे भूमिगत झाले होते. परंतु, ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक आहेत हे त्यांच्या कालच्या सभेत दिसले. त्यांचे हेच वैशिष्ट्य असून ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात हे मला माहीत नाही’, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज ठाकरेंच्या तोंडाला कुणीही मर्यादा आणू शकत नाही. उत्तर प्रदेशचे कौतुक करायला त्यांना काय दिसले मला माहीत नाही. लखीमपूरमध्ये शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. परंतु, अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असे राज ठाकरे म्हणत असतील तर मला त्यावर भाष्य करायचं नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!