मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयातील लिफ्टमध्ये दिवंगत लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचा संदर्भ देत राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे.
यासंदर्भात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘मी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांना भेटायला पश्चिम बंगालच्या मंत्रालयात गेलो होतो. तेव्हा मंत्रालयामध्ये गेल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पश्चिम बंगालच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्र राज्याने पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या लोकांना उचलून धरलं पाहिजे.’ तसेच पश्चिम बंगालने जो निर्णय घेतला तसाच निर्णय आपणही घ्यायला हवा. महाराष्ट्राच्या मंत्रालयात लिफ्टमध्ये लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे. जो येईल त्याच्या कानावर ही गाणी पडली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना, शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता
- “खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”


