Share

“…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका मला अटक करा असे छातीठोक सांगणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंनी कृपया सांगा पाटणकर, यशंवत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते? मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नवाब मलिक यांचे समर्थन आपण करत आहात’, असे उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, ‘टाका मला तुरुंगात… कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल विधानसभेत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!