🕒 1 min read
सिंधुदुर्ग:- भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये असलेलं वैर सर्वश्रूत आहे. नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातही शिवसेना सत्तेत असल्यामुळे राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टोकाची टीका करताना दिसतात. त्यांच्या या टीकेमुळे शिवसेनेच्या नेत्यांकडूनही राणे यांच्यावर प्रतीवार केला जातो.
तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून आज जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे नंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.
तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर हाच आक्षेप राणे आणि राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील – जयंत पाटील
- तृप्ती देसाई यांच्या विरोधात बाह्मण महासंघाचे पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
- ग्रामीण विद्यार्थ्यांना भरतीत प्राधान्यासाठी FLIP TPO संकल्पना – डॉ. अभय वाघ
- ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं या मागणीशी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सहमत आहेत का ?’
- तेरा वर्षीय मुलीसोबत लग्न, नवरदेवाविरोधात पॉक्सोचा गुन्हा


