औरंगाबाद : सध्या उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभमेळा सुरू आहे. त्याकरिता देशभरातून हजारो भाविक गेले आहेत. पण कोरोनाचा संसर्ग पाहता कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाइन करण्यात यावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत एमआयएम विद्यार्थी आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात महाराष्ट्रातून अनेक साधू व भक्त गेले आहेत. तेथे लाखोंच्या संख्येत भाविक उपस्थित होते. कोरोनासंदर्भात कुठल्याही नियमांचे पालन केले नसल्याने मेळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात आधीच कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेड मिळणे, आवश्यक औषधे मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुंभ मेळ्याहून परतलेले भाविकांच्या संपर्कात येवून इतरांना कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष पथके नेमून कुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांच्या तपासणीचे नमुने घेऊन त्यांना क्वॉरन्टाइन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

