मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडवला आहे. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले आहे. या सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे.
या ऐतीहासिक विजयानंतर भारतीय हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान पंजाब सरकारने हॉकी संघातील पंजाब राज्याच्या खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघात आठ खेळाडू हे पंजाब राज्यातील आहे. ज्यात कर्णधार मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, हार्दिक सिंह, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे.
On this historic day for #IndianHockey I am delighted to announce a cash award of Rs 1crore each to players 4m #Punjab
We await ur return to celebrate the much deserving medal in #Olympics #Cheer4India #Tokyo2020 #IndvsGer #Hockey #IndianHockeyTeam@capt_amarinder @Media_SAI https://t.co/VJ8eiMu1up
— Dr.Rana Gurmit S Sodhi (@iranasodhi) August 5, 2021
काही दिवसापुर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात गोल करणारे खेळाडू हे पंजाबचे होते असे ट्विट केले होते. यानंतर क्रीडाप्रेमीनी त्यांना बॉलीवूडमधील ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील शाहरुख खानचा संवाद ऐकवत टीका केली होती. जर्मनीने या सामन्यात सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफुटवर ढकलले. मात्र तिसऱ्या सत्रापुर्वी भारताने सलग दोन गोल केले. यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत आणखी दोन गोल करत ५-३ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ भारत इंग्लंड सामन्यातील रिकामी खुर्ची आणि तिची कहाणी
- भन्साळीच्या बैजु बावरामध्ये कार्तिकऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी
- विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला– सामंत
- ‘राहुल गांधींनी ‘त्या’ पीडित कुटुंबाचा फोटो प्रसिद्ध करणे गुन्हा आहे का?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘पुण्यावर अजूनही बंधनं का आहेत, हेच मला कळेना?’, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवालृ


