Share

‘पुण्यावर अजूनही बंधनं का आहेत, हेच मला कळेना?’, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Published On: 

पुणे: जिल्ह्यात कोरोना रेट अधिक असल्याने या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुण्यातील व्यापारी तसेच राजकाकीय मंडळीतून विरोध केला गेला. आता यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारला सवाल केला आहे. पुण्यात करोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अमृता फडणवीस या सध्या पुण्यात आहेत. त्यांच्या हस्ते एका हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी निर्बंधावर प्रतिक्रिया दिली. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. करोनाचे रुग्ण आता कमी झालेत. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. त्यामुळे याठिकाणी निर्बंध शिथिल करायला हवेत असेदेखील त्या म्हणाल्या आहेत.

सरकारने लहान व्यापाऱ्यांचा विचार करायला हवा. सततच्या निर्बंधामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळते आहे. त्यामुळे पुणे भागाचा सरकारने विचार करायला हवा तर पुणेकरांनीच आंदोलन करायला हवे असेदेखील अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!