Share

“आता पुजारा आणि रहाणेचे संघात पुनरागमन अशक्य”; जडेजाचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. तेव्हापासून रहाणे आणि पुजाराचे संघात निवड न झाल्याने चर्चा होत आहे .ते कसोटी संघात पुनरागमन करू शकतील की नाही यावर अनेक जणांनी आपले मत मांडले आहे. यात माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी रहाणे आणि पुजारा संघात परत येऊ शकत नाहीत असे ठाम वक्तव्य केले आहे.

अजय जडेजा म्हणाले “दोघेही एकच फॉरमॅट खेळणारे खेळाडू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांना त्या एका फॉर्मेटमधून बाहेर काढता, तेव्हा मला ते परत येताना दिसत नाहीत. मला आशा आहे की मी चूक असावे. कारण हे दिग्गज आहेत. त्यांनी ८०-९० कसोटी सामने खेळले आहेत. आजूबाजूला पुरेशी प्रतिभा आहे. नवीन पिढीने त्यांना मागे ढकलले आहे. मला वाटत भारतीय क्रिकेटमध्ये अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे निरोप घेण्याची संधी मिळाली नाही. ही नेहमीच एक दुःखद कथा राहिली आहे.”

अजय जडेजा यांच्या आधी आकाश चोप्रानेही अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे संघात पुनरागमन कठीण असल्याचे सांगितले होते. त्याच्या मते २०२३ पर्यंत तरी हे दोघे संघातून बाहेर असतील. रहाणे आणि पुजारा भारतीय कास्ट संघाचे महत्वाचे खेळाडू राहिले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून या दोघांचीही कामगिरी ढासळली आहे. ज्यामुळे आगामी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत त्यांना संघात जागा मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!