Share

रामदास आठवलेंच्या नेतृत्वात वीजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी रिपाइंचे उद्या आंदोलन

Published On: 

मुंबई   – लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबिलाची रक्कम 50 टक्के माफ करावी; विजबिल भरले नाही म्हणून कोणाचाही मीटर कट करू नये; तसेच अर्धे वीजबिल माफ करून उर्वरित विजबिल रक्कम भरण्यासाठी  मासिक हफत्याने भरण्याची सवलत द्यावी या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता बांद्रा पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यलयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले करणार असल्याची माहिती या आंदोलनाचे संयोजक रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे.वीजबिल 50 टक्के माफ करावे या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष आक्रमक झाला असून उद्या दि. 25 नोव्हेंबर रोजी राज्यभर अनेक जिल्ह्यात विजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

उद्या दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयांवर वीजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ भोसले यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!