Share

योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून योग्य वेळ आल्यावर भूमिका मांडेन असे सूचक विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशाराही दिला होता.

‘योग्य वेळ आल्यानंतर सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सपाटून बोलणार आहे,’ असंही उदयनराजे भोसले म्हणाले. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले होते.

गुणवत्तेनुसार आरक्षण मिळाले पाहिजे या आपल्या भूमिकेचा उदयनराजे यांनी पुनरुच्चार केला आहे. बांदा येथे त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही अनौपचारिक गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना आर्थिक मागास प्रवर्गातील EWS आरक्षण स्वीकारु नये, असं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी यापूर्वी देखील राज्य सरकारकडे मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका मांडली होती. EWS आरक्षण स्वीकारल्यास SEBC च्या आरक्षणाला अडचण निर्माण होईल, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!