Share

“…तो न्याय नागपूरला का लागू करत नाही?”; आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५०० चौरस फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीला उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महानगरपालिकेवर दरवर्षी ३४० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांचे जवळपास १५  लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंबे राहतात या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, उपराजधानी नागपूर इथेही कर माफीची घोषणा करावी अशा मागणीचे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.  “ज्या प्रमाणे मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला. त्याच प्रमाणे नागपूर येथील घरांसाठी सुद्धा मालमत्ता करमाफी घोषित करण्यात यावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल”, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

आशिष देशमुख म्हणाले, “नागपूर हे भौगोलिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे. मागच्या एक ते दीड दशकामध्ये भोवतालच्या ग्रामीण भागातले लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरात वास्तव्याला आले. मुंबईकरांना मिळाला तो न्याय नागपूरला का लागू करत नाही, असा प्रश्न सन्मानीय मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यांना मी या आशयाचं पत्र देखील पाठवले आहे.”
महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!