Share

‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दात टीका केली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील टीका करत निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय असल्याचे म्हणले आहे.

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहिजे. मागील ४ वर्षांपासून जे पैसे तुम्ही घेतले असतील ते मुंबईकरांना परत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याच सोबत ५०० फुटांपर्यंतचा शून्य कर धोरण मध्यमवर्गीयांना सुद्धा लागू करा, असंही शेलार यावेळी म्हणाले.

आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर ही टीका केली आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत, विदेशी दारुला करात ५० टक्के सुट दिलीत त्याच सोबत वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली आणि आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!