मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव हे ‘टाइम पास’ चित्रपटांच्या यशानंतर तिसरा भाग घेऊन येत आहे. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीत विघ्न येत आहे. कारण या चित्रपटाचे सहनिर्माते मौर्य फिल्म अँड एंटरटेन्मेटचे राजकुमार दहाने आणि दिग्दर्शक रवी जाधव या दोघात वितुष्ट आले आहे. हे दोघेही एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
करारानुसार ‘टाइम पास’ या चित्रपटाचे सहनिर्मिते मौर्य फिल्म अँड एंटरटेन्मेन्टचे राजकुमार दहाने यांनी रवी जाधव यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देताना रवी जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप निराधार आहेत असे रवी जाधव यांचे म्हणने आहे. रवी जाधव यांच्या वकिलाने दोन आठवड्यापुर्वी मौर्य फिल्म्सला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर त्यांचा मौर्य फिल्म्ससोबत करार संपुष्टात आला होता. ‘टाइमपास ३’ चित्रपटाच्या अर्थसहाय्य करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी भंग केला, असा आरोप रवी जाधव यांनी केला आहे.
निर्मात्याकडून पैसे न मिळाल्याने २ महिने प्रतिक्षा करुन आखेर स्वत:च्या पैशातुन चित्रपट निर्माण करावा लागला. मौर्य फिल्म्स आम्हाला आणि युनिटला त्रास देत आहेत. तसेच चित्रपटाच्या निर्मितीत हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे रवी जाधव यांनी मौर्य फिल्म्स आणि आणि त्यांच्या प्रतिनिधीना फसवणुक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. असे रवी जाधव हे म्हणाले. या सिनेमात हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- लष्करासाठी राखीव रुग्णालयात नाशिकच्या कोरोना रुग्णांना मिळणार उपचार- चंद्रकांत पाटील
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथं लागलाय’ ; बेजबाबदार नागरिकांचा फोटो शेअर करत हेमांगीने व्यक्त केला संताप
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या
- फडणवीसांच्या पुतण्याला कोरोना लस; जितेंद्र आव्हाडांची फक्त दोन शब्दांची प्रतिक्रिया !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

