पंजाब : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, याच कृषी कायद्यांवरून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – बादल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता.
शिरोमणी अकाली दल या सुखबीरसिंग बादल यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या युतीला देखील राम–राम ठोकला आहे. अकाली दल आणि भाजप यांची जवळपास २२–२३ वर्षांपासून युती होती. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ काही महिन्यातच एनडीएमधील भाजपच्या जुन्या मित्रपक्षाने साथ सोडल्याने धक्का बसला आहे.
दरम्यान, ‘नव्या कृषी कायद्याला विरोध असणाऱ्या शेतकरी संघटनांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधायला हवा. त्यांच्या समस्या ऐकून त्यावर सर्वमान्य तोडगा काढला जावा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) व्यवस्था संपुष्टात येईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. तर, बादल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, लहान शेतकरी त्यांचा शेतमाल दूरवर नेऊ शकत नाही. ते अनेक महिने शेतमाल साठवूही शकत नाही. त्यामुळे शेतमालाच्या किमतीबाबत ते खासगी कंपन्यांशी घासाघीस करु शकणार नाहीत, असं मत व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- लाॅकडाऊनमध्येही अण्णा हजारे थांबले नाहीत; हे केले महत्त्वाचे काम!
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- आम्ही फक्त ‘या’ तिघांनाच राजे मानतो; वक्तव्यावर ठाम असल्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका
- छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक कधी होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती


