Share

Sanjay Raut : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी; संजय राऊतांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच सत्तेवर असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना विरोधात बसावं लागलं. मात्र शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आता सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्यावर निशाणा साधून आहेत. संजय राऊत हे शिंदे सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांनी आता निशाणा साधलाय. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, असं राऊत म्हणाले.

जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत. तर पुढे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!