मुंबई : राज्यात पुढील चार दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील विविध भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसतील, अशी माहिती दिली आहे. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच राज्यात पावसाची शक्यता आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरचं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या पाच दिवसांत राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.
त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या ५ दिवसांत मान्सूनचे दमदार आगमन होणार असून नागरिकांना विजांच्या गडगडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पाऊसाचा सरी अनुभवता येणार आहे. वादळी वाऱ्यासह बरसणारा हा पाऊस राज्यात पुढील ४ दिवस म्हणजेच ३१ मेपासून ते ३ जूनपर्यंत सक्रिय राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ढगाळ वातावरण तयार झाले असून पुढील २४ तासांत पालघर, ठाणे, धुळे, नागपूरमध्ये हलका पाऊस होईल. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे अंदाज आहे. या भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
- केरळमध्ये मुस्लिमांना ८० टक्के शिष्यवृत्तीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द
- ‘ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी आरक्षण गमावले’, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

