Share

Prakash Ambedkar | गुजराती माणूस निघुन गेल्याने मुंबईवर काही परिणाम होणार नाही – प्रकाश आंबेडकर

Published On: 

पुणे : आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतून गुजराती माणूस निघून गेल्यास मुंबईवर काहीही परिणाम होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे त्यांनी असंही सांगितलं कि, “मुंबईतील मिल्स या राजस्थानी माणसांच्या होत्या पण संपानंतर ते इथून निघून गेले. परंतु ते गेल्यानंतर सुद्धा मुंबई आर्थिक राजधानी राहिली. कापड बाजारावर राजस्थानी लोकांचं असलेलं वर्चस्व संपलं आणि आता या बाजारावर दक्षिणेकडील लोकांचं वर्चस्व आहे, अशी परिस्थिती दिसून येते.”

“तर दुसरीकडे मुंबईमध्ये असणारा जो गुजराती माणूस आहे, तो इलेक्ट्रॉनिक बाजारातला नसून दाना बाजार आणि दवा बाजारामध्ये गुंतलेला आहे आणि तो अधिक प्रमाणात दलाली करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो गुजराती माणूस सुद्धा निघून गेला तरीही मुंबईवर काहीही परिणाम होणार नाही. उलट गुजराती माणूस इथून निघून गेल्यास जी परिस्थिती राजस्थानी मिल मालकांची झाली तीच परिस्थिती गुजराती माणसांचीही होईल. मात्र मुंबईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, याची जाणीव राज्यपालांना नसावी”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!