Share

संभाजीराजे सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही – प्रकाश आंबेडकर

Published On: 

मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात भेट होत आहे.

दुसरीकडे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावे. अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता. तसेच ते कोल्हापुरात मुक आंदोलनात सहभागी देखील झाले होते.

राजे सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. जे जे लोक आरक्षणाच्या भूमिकेला पाठींबा देणारे असतील त्यांना सोबत घ्यावे. आम्ही ही सोबत असू. असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!