अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. शनिवारी या मालिकेतील निर्णायक आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाच्या खिशात मालिका जाणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल अपयशी झालेला भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला संघाबाहेर केले जाऊ शकते. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात राहुलला संधी मिळाली आहे. मात्र या चारही सामन्यात राहुल चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवले जाऊ शकते. राहुल संघाबाहेर झाला तर भारतासमोर पहिला पर्याय असेल तो इशान किशनचा आणि दुसरा पर्याय आहे तो शिखर धवनचा. इशान किशनने पदार्पनाच्या सामन्यात सलामीला येत शानदार अर्धशतक करत भारताला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर शिखर धवनला केवळ एकाच सामन्यात संधी देण्यात आली होती.
यादरम्यान चौथ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सुर्यकुमारला संघात कायम ठेवले जाईल. इतर फलंदाजात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र गोलंदाजाची कामगीरी पाहता अंतिम सामन्यात भारतीय संघ हा एका फिरकीपटूसोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण फिरकी गोलंदाजानी दिलेल्या धावांचे प्रमाण हे जलदगती गोलंदाजापेक्षा जास्तच आहे.
महत्वाच्या बातम्या
- पराभवानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने मान्य केली चुक, आयसीसीनेही केली कारवाई
- सलमान खानच्या चाहत्यासाठी महत्वाची बातमी
- नागपुरात कोरोनाचा कहर, पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक !
- माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात, ८५ हजारांचा दंड
- हर्ट अटॅकनंतर पहिल्यांदाच टीव्ही शो मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा झाला भावुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

