Share

माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात, ८५ हजारांचा दंड

Published On: 

नांदेड : जिल्ह्यात माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुखेड तालुक्यातील वेगवेगळया १७ प्रकरणात विहित मुदतीत संबंधितांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधीतांना १७ प्रकरणात प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे ८५ हजार रुपयाच्या दंड राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठोठावला आहे. त्यामुळे वेळेत माहिती न देणाऱ्या मंडळींना आता तरी जाग येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

माजी जि. प. सदस्य बालाजी बंडे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ६ (१) अन्वये संबंधीताकडे माहिती मागीतली पण मुदतीत माहिती न दिल्याने माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९ (१) अन्वये प्रथम अपिल अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. अपिलामध्ये माहिती देण्याचे आदेश होवुनही माहिती न दिल्याने, माहिती अधिकार अधिनियम २००५ चे १९ (३) अन्वये राज्य माहीती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे द्वितीय अपिल दाखल केले यावर खंडपीठामध्ये सुनावणी होऊन खंडपीठाने विहित मुदतीत माहिती देण्याचे व माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ७ (१) चा भंग झाल्याने, याबाबतचा खुलासा ३० दिवसात आयोगाकडे सादर करण्याचा आदेश दिला होता.या आदेशाच्या प्रती सर्व संबंधीतांना दिल्या होत्या.

या ठोठावण्यात आलेल्या दंडामुळे येणाऱ्या काळात माहिती देण्यात विलंब करणाऱ्याना मोठा फटका बसणार आहे. या पुढे लवकर माहिती देण्यात विलंब केल्यास आपल्याला वर ही कारवाई होऊ शकते या भीतीने तरी या पुढे लवकर माहिती मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!