मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुठेही औषधे किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आलेले नाहीय मात्र असे असताना भाजपाने राजकारण करुन बदनामी सुरू केलीय. त्यामुळे हे राजकारण बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
भाजपाच्या गुजरात रेमडेसिवीर साठा-वितरणावर टीका झाल्यावर भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मदतीकडे बोट दाखवले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुग्णांना वैयक्तिक मदत न करता जिल्हा प्रशासन व पालिकांच्या यंत्रणांना वितरण केले आहे. पक्ष व्यासपीठांवर मदत दिलेली नाही असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे .
गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यातून नैराश्य आलेल्या भाजपकडून आता राज्यात राष्ट्रवादीच्या विरोधात अशाप्रकारचे राजकारण सुरू करण्यात येत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे प्रकरणात नवा ट्वीस्ट, चौकशी करणाऱ्या NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

