मुंबई : मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र पाच वर्षांच्या काळात प्रकल्पाने चांगली प्रगती केली असून मी देखील त्याच मंत्रिमंडळात सहभागी होतो. अनेकांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. त्यामुळे अडथळे दूर होतील, असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला.
या मेट्रोमुळे अनेक गाड्यांचं इंधन वाचणार आहे. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, वायू प्रदूषण दूर होईल, या निमित्ताने राजकीय प्रदूषण ही बंद झालं आहे. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | आमदार गद्दार नसून खरे गद्दार उध्दव ठाकरेच – नारायण राणे
- Ganesh Chaturthi | कोणत्या शुभ मुहर्तावर येणार लाडके गणपती बाप्पा, कधी अन् कशी करावी पूजा, जाणून घ्या
- Kirit Somaiya | गणपतीनंतर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ‘हे’ स्मारक जमीदोस्त होणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
- Shahjibapu Patil। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला; पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- Anna Hazare | “तुम्हाला सत्तेची नशा चढलेली…” ; अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांच्या दारू धोरणावर टीका


