🕒 1 min read
मुंबई : भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटात गेलेले आमदार गद्दार नसून खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत ठाकरे मुख्यमंत्री झाले, असेही राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले, असा घणाघात बावनकुळेंनी केला.
नारायण राणे म्हणाले, आमदारांशी आणि पक्षाशी खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पद हे गद्दारी करुन मिळवलं. भाजपशी गद्दारी केली. कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांशी गद्दारी केली. आमदारांना कोणत्याही प्रकारे मदत, सहकार्य आणि भेटी दिल्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी जी कामे केली ती त्यांचे नातेवाईक आणि मोतोश्रीसाठी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत.
उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत-
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत. पारिवारिक प्रेमामध्ये सर्व गोष्टी ते विसरुन गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनचरित्राला बगल देऊन ते आपले कामे करत आहेत.”
उद्धव ठाकरेंची भूमिका कळत नाही-
“उद्धव ठाकरेंची भूमिका कळत नाही त्यांचं हिंदुत्व खरचं बेगडी आहे. जे शरद पवार आणि काँग्रेससोबत बसतात, ते कशाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात. मतदानाच्या वेळी जनता ठरवेल खोट कोण आणि खरे कोण?,” असेही बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | गणपतीनंतर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ‘हे’ स्मारक जमीदोस्त होणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
- Shahjibapu Patil। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला; पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- Anna Hazare | “तुम्हाला सत्तेची नशा चढलेली…” ; अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांच्या दारू धोरणावर टीका
- Shahjibapu Patil। “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा, कारण ते बाळासाहेबांच्या…”; शहाजीबापू पाटलांच वक्तव्य
- Chandrakant Patil । कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाटलांनी केलं दुर्लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
