नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला (Congress) माय लेकाचा पक्ष म्हणून नामांतर करा असे सूचित केले. तसेच त्यांनी काँग्रेसने देशात कोरोना पसरवला आहे असा आरोप केला. काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे देशाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. काँग्रेसची बऱ्याच राज्यात अजून एकदाही सत्ता आली नाही. आमचा एखादा पराभव झाला तर आम्ही अनेक महीने त्यावर चिंतन करतो, परंतु काँग्रेस एवढ्या वेळा हरून सुद्धा त्यांचा अहंकार जात नाही, असे मोदी म्हणाले.
सदी के सबसे बड़े संकट- कोरोना वैश्विक महामारी के समय जब देशों की आर्थिक स्थिति बिगड़ गई थी, तब भी हमारी सरकार ने MSP पर रिकॉर्ड खरीददारी की। हमारी सरकार तब भी किसानों के साथ खड़ी थी ओर आज भी खड़ी है।#ModiInRajyaSabha pic.twitter.com/geeLgTGrRT
— Vinod Tawde (@TawdeVinod) February 8, 2022
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकाऱ्यांबाबत बोलताना म्हणाले, कोरोनाच्या (Corona) वैश्विक महामारी सारख्या काळात जेव्हा जगभरातील देशांची आर्थिक स्थिती बिघडली होती, तेव्हा आमच्या सरकारने एमएसपी (MSP) वर रेकॉर्ड खरेदी केली होती. भाजप सरकार त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी होते आणि आजही उभी आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘कॉंग्रेसच्या काळात लता मंगेशकरांचा अपमान’; पंतप्रधानांचा हल्लाबोल
“मला त्यांनी दोन तीनदा संघात येण्याचे निमंत्रण दिले..” ; विराट कोहलीचा गौप्यस्फोट
राज्यसभेत नरेंद्र मोदींकडून शरद पवारांचे कौतुक! म्हणाले, “निराशेने ग्रासलेल्या…”


