मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने मेगा ऑक्शन आधी आपल्या खेळाडूंसोबत पॉडकास्ट रेकॉर्ड केले आहे. ज्यात एबी डिव्हिलियर्स , युझवेंद्र चहल आणि विराट कोहली यांनी आरसीबी सोबतच्या प्रवासाबाबत सांगितले आहे. ज्यात विराट कोहली याने मोठे खुलासे केले आहेत.
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा भाग आहे. त्याने १४ हंगाम त्यांच्यासोबतच खेळले आहेत. त्याने पॉडकास्ट मध्ये बोलताना इतर संघानी या काळात त्याला आरसीबी सोडत त्यांच्या संघात सामील होण्याचा प्रस्ताव दिल्याचे तो म्हणाला आहे. “माझ्याशी काही वेळा संपर्क साधला गेला आहे तसेच ऑक्शनमध्ये येण्यासाठीही सांगितले गेले. मी याबाबत विचारही केला होता.”
विराटने यावेळी तो आरसीबीसोबत इतके वर्ष खेळत असल्याने संघ न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले आहे. “आरसीबी सोबतची निष्ठा आहे.या फ्रँचायझीने मला पहिल्या तीन वर्षांत खूप काही दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला, ही सर्वात खास गोष्ट आहे. अनेक संघांना संधी मिळाली. मात्र त्यांनी मला पाठिंबा दिला नाही तसेच विश्वास ठेवला नाही.” विराट कोहली १४ हंगाम एकाच संघासोबत खेळणारा पाहिला क्रिकेटर ठरला आहे. त्याच्या कर्णधारपदात संघाला एकही विजेतेपद न जिंकता आल्याने त्याने २०२१ मध्ये ९ वर्षे नेतृत्व केल्यानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. आता तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला मायलेकाचा पक्ष असे नाव द्या – नरेंद्र मोदी
- Praveen Kumar Death : महाभारतात ‘भिम’ साकारणारे प्रवीण कुमार काळाच्या पडद्याआड
- “वॉर्नरला खरेदी करा तो चांगले रील बनवतो” ; चाहत्यांची राजस्थान संघाला अजब विनंती
- ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; अनेक मोठे खेळाडू यादीत
- वर्ल्डकप संघात निवड न झाल्याने “ही” महिला क्रिकेटर आता खेळणार हॉकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

