औरंगाबाद : कोरोनामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र या कालावधीत किसान रेल्वेने आर्थिक बाजू सांभाळण्यात मोलाची भूमिका निभावली असून यंदा नांदेड रेल्वे विभागास जवळपास २८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे रेल्वे विभागास मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
नांदेड रेल्वे विभागातील नगरसोलहून २०० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेऊन पश्चिम बंगाल येथील मालदा टाऊन येथे रवाना झाली. या वर्षी ५ जानेवारीला सुरू झालेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त १६३ दिवसांत २०० किसान रेल्वेेने नगरसोलहून देशाच्या विविध भागांत कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचवण्यात आले. यातून नांदेड रेल्वे विभागास २८.३५ कोटींचा महसूल प्राप्त झाला.
२०० किसान रेल्वेमधून आजपर्यंत ६१ हजार ७४७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतमाल न्यू गुवाहाटी, नावगाचिया, डानकुनी, मालदा टाऊन, गौर मालदा, अागरतळा, फातुहा, न्यू जलपायगुडी आदी ठिकाणी पोहोचवण्यात आला. मालवाहतूक भाड्यात ५०% सवलतीचा इतर ठिकाणांवरील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंघ यांनी केले.किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किती प्रतितास या वेगाने त्या धावतात व शेतमाल वेळेवर पोहोचतो.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!
- अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
- राज्य सरकार केंद्राला भाड्याने चालवायला द्या – माजी मंत्री बबनराव लोणीकर
- गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल द्या, एमआयएमची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
