🕒 1 min read
मुंबई : भारतातील वाढत्या कोरोना संकटात इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) सेफ बायो बबलमधील खेळाडूंसाठीही चिंता केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा (आरआर) वेगवान गोलंदाज एंड्रयू टायने भारतात वाढत्या कोरोनामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) केन रिचर्डसन आणि अॅडम जंपा यांनीही वैयक्तिक कारणास्तव लीग सोडण्याचा निर्णय घेतला.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-भारत विमान प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थतीत हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान संघातील स्टिव स्मिथ देखील IPLमधून माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
मात्र, आयपीएल मधून मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर वेगळेच संकट उभे राहिले आहे. सद्य परिस्थितीत मायदेशी परतू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना सरकार कमाल ६६ हजार डॉलर्स दंड ठोठावेल अथवा पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल अशी बातमी सिडनी हेरॉल्डने दिली आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडू वैयक्तिक जबाबदारीनं भारतात गेले आहेत म्हणून त्यांनी परतण्याची व्यवस्थाही स्वत:हूनच करावी, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आपण एकजूट दाखवली तर या विषाणूविरोधातील चळवळ यशस्वी होईल’
- केंद्राकडून राज्यांना मदतीचा हात, 8873.6 कोटी रुपयांचा दिला अॅडवान्समध्ये निधी
- भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही,सीरम कंपनीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भारताला आता कडक लॉकडाऊनची गरज, ज्यो बायडन यांच्या प्रमुख आरोग्य सल्लागाराचे मत
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा

