🕒 1 min read
काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.
#WATCH | Indian Air Force C-17 aircraft that took off from Kabul, Afghanistan with Indian officials, lands in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/1w3HFYef6b
— ANI (@ANI) August 17, 2021
अफगाणिस्तानात भारतीय नागरिकांची संख्या देखील अधिक असून भारतीय हवाई दलाने त्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यास आता सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातच्या जामनगर विमानतळावर हे विमान उतरले.
#WATCH | Evacuated Indians from Kabul, Afghanistan chant 'Bharat Mata Ki Jai' after landing in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/IqvESz79IO
— ANI (@ANI) August 17, 2021
आज भारतात परतलेल्या नागरिकांमध्ये भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. अद्यापही तेथे अडकलेल्या नागरिकांचा आकडा हा अधिक असून भारतीय हवाई दल त्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. दरम्यान, आज परतलेल्या भारतीयांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर या नागरिकांनी भारतीय हवाई दलाचे व सरकारचे आभार मानत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
