Share

“भरकटलेल्या मनाची माणसं गांजा पिल्यासारखं बोलतात”, संजय राऊतांचा मुनगंटीवारांना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य होते, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भरकटलेल्या मनाची माणसं गांजा पिल्यासारखं बोलतात. राजाकरणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊत मुंबई येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकत आलो आहे. पण कोणी कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी ते ठरवलेलं आहे.

भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं आहे. डोकी थंड झाली की नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांच मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नव्या वर्षानिमित्त प्रार्थना करतो, असेही राऊत म्हणाले.

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी ३८ तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध केल्यावर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

“भरकटलेल्या मनाची माणसं गांजा पिल्यासारखं बोलतात”, संजय राऊतांचा मुनगंटीवारांना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य होते, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भरकटलेल्या मनाची माणसं गांजा पिल्यासारखं बोलतात. राजाकरणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊत मुंबई येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकत आलो आहे. पण कोणी कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी ते ठरवलेलं आहे.

भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं आहे. डोकी थंड झाली की नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांच मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नव्या वर्षानिमित्त प्रार्थना करतो, असेही राऊत म्हणाले.

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी ३८ तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध केल्यावर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!