चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, भाजप सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
चंद्रपूर जिल्ह्यात २०१० पासून दारूबंदीचे आंदोलन सुरु केलेल्या श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. परोमिता गोस्वामी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाने अतिशय निराश झाल्या आहेत. ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘या निर्णयाने मला आज अतिशय वाईट वाटत आहे. ज्या पद्धतीने सरकारने महामारीच्या काळात ही बंदी उठवली आणि दारू ही काय जीवनावश्यक वस्तू नाहीये. आज लोकांच्या हाताला काम नाही, खायला मिळत नाही, रोज लोक मरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मृत्युदर कमी कसा करता येईल ? लोकांना मृत्यू पासून कसे वाचवता येईल अशी अपेक्षा सरकारकडून होती मात्र झालं वेगळच’. असे परोमिता गोस्वामी म्हणाल्या आहेत.
तर, ‘किमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तरी असा निर्णय घेण्याची अपेक्षा नव्हती. एक पालकमंत्री म्हणजे काय सर्वेसर्वा नसतो. जे मुख्यमंत्री इतके संवेदनशील आहेत, छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंचे नाव घेणारे आहेत. त्यांच्याकडून तरी संवेदनशीलता महिलांच्याप्रती संवेदनेची अपेक्षा होती. किमान महामारी मध्ये तरी असा विचित्र निर्णय घेणार नाहीत’. अशी थेट नाराजी परोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रस्ता रोको, जेलभरो इतकेच काय महिलांनी मुंडण करून केलेली दारूबंदी ठाकरे सरकारने एका झटक्यात उठवली !
- जालन्यात लसी उपलब्ध; मात्र ऑनलाईन नोंदणी असेल तरच मिळणार लस
- ‘राधे’ सिनेमातील भूमिकेमुळे नाराज असलेलल्या चाहत्यांना प्रविण तरडे यांनी दिले ‘हे ‘उत्तर
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- विराट पाठोपाठ धोनीच्याही बिअर्ड लूकवर फॅन्स फिदा ; म्हणाले….


