🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून परीक्षेसाठी भरलेली फी परत परत करण्याची मागणी पालक संघटनांकडून होत आहे. प्रत्यक्ष परीक्षेचे शुल्क परत करणे अवघड असून परीक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यामुळे शुल्क परत देणे शक्य नसल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने रद्द केल्या आहे. त्यानंतर नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षा न झाल्यामुळे शुल्क परत करावे अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे. दहावीसाठी ४१५ तर बारावीसाठी ४३० शुल्क घेण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी एक लाख ४६ हजार ४१० दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८३ हजार ६११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
या विद्यार्थ्यांचे एकूण २७ कोटी ८८ लाख ६७ हजार ७४५ रुपये मंडळाकडे जमा झाले आहे. सीबीसी धर्तीवर राज्य मंडळाने देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा रद्द केली असली तरी मंडळाकडून परीक्षा तयारीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने राज्य मंडळाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती. त्यानुसार प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका कशी खरेदी छपाई करण्यात आली होती. संबंधित शाळा महाविद्यालयात परीक्षा घेण्यासाठीचे साहित्य पाठविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क परत करणे अशक्य असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घरी परतणाऱ्या पादचारी वयोवृद्ध हॉटेल कामगाराचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
- …तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद
- ‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’ ; कपिल सिब्बल यांचा दावा
- अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेत्या बाप-लेकीचा मृत्यू, तर मामा गंभीर जखमी
- पुण्यात उद्यापासून आणखी नियम शिथिल होणार; जाणून घ्या आज किती सक्रिय रुग्ण ?


