मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळात भाजप नेते प्रत्येक भागात जाऊन चर्चा करतील. येत्या 26 जूनला चक्काजाम आंदोलन करु. आम्ही न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोना काळात आर्थिक स्थिती ढासळली ; त्यात मालमत्ता करवाढीचा बोजा टाकणार नाही’
- स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला सावध राहण्याचा सल्ला
- ‘वाझे, शर्मा ‘हे’ धाडस करू शकतात ? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वेगळाच’
- हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांकडे मागितली किडनी विकण्याची परवानगी !
- …तर काँग्रेस पक्ष आडवा येईल ; भाई जगताप यांची आक्रमक भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

