🕒 1 min read
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने १० मते अतिरिक्त मिळवली होती. आज भाजपाने विधान परिषद निवडणुकीत नवा विक्रम रचला आहे. विधान परिषदेच्या पहिल्या पसंतीची भाजपाला तब्बल १३३ मते मिळाली आहेत. भाजप आणि अपक्षांच्या ११३ संख्याबळाच्या शिवाय भाजपाला २० मते ज्यादा मिळाली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ही जास्तीची २० मते महाविकास आघाडीकडून फोडली आहेत. भाजपाचे १०६ आमदार आहेत. आणि भाजपला ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. म्हणजेच भाजपाचे ताकत ११३ होते, प्रत्यक्षात भाजपाला पहिल्या फेरीत १३३ मते मिळाली आहेत. या विजयानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या आमदारांचा असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
