हिमाचल प्रदेश : करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा देशभरात थैमान घातले आहे. यामागे नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे प्रमुख कारण आहे. करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे ही प्राथमिक खबरदारी असतानाही लोक याकडेही दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वारंवार जनजागृती करुनही या नियमाचा भंग होत असल्याने आता हिमाचल प्रदेश या राज्याने याविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्याला थेट अटक करण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत.
“कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास तिला कुठल्याही वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल, तसेच या गुन्ह्याबद्दल आठ दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल किंवा ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल,” अशी माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
तसेच आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमध्ये कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जयपूर, जोधपूर, कोटा, बिकानेर, उदयपूर, अजमेर, अलवार आणि भिलवाडा या आठ जिल्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच बाजार, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणं उघडी राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’
- ‘माझ्यावर विष प्रयोग करणाऱ्या व्यक्ती बद्दल मला माहित होते’, लता दीदींचा धक्कादायक खुलासा
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

