🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी दोन्ही सदनांच्या सभासदांसमोर राष्ट्रती अभिभाषण करतात. मात्र यंदाच्या अधिवेशनाआधी होणाऱ्या या अभिभाषाणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली त्याचा विरोध करण्यासाठी हा बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवरून विरोधकांचे नकारात्मक राजकारण सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
We're issuing a statement from 16 political parties that we're boycotting President's Address that will be delivered at Parliament tomorrow. The major reason behind this decision is that the Bills (Farm Laws) were passed forcibly in House, without Opposition: GN Azad, Congress pic.twitter.com/9uhtfLKh67
— ANI (@ANI) January 28, 2021
१६ विरोधी पक्षांनी हा बहिष्कार टाकला आहे.राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि एआययूडीएफ यांचा समावेश आहे.
‘आम्ही १६ राजकीय पक्षांद्वारे एक निवदेन जारी केले असून संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहोत. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणाजे केंद्र सरकारने कृषी कायदे सभागृहात विरोधकांशिवाय जबरदस्तीने मंजूर केले आहेत’, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द मात्र न्यायालयात हजर राहावं लागणार !
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- दिल्लीत घडलेल्या घटनेची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई झालीच पाहिजे : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

