🕒 1 min read
नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली धरली आहे.
२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.
या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत
प्रजासत्ताक दिनी जगाचे भारत देशाकडे लक्ष लागलेले असताना त्याच दिवशी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत आततायीपणा केला. आंदोलनाचा अतिरेक करीत लालकिल्ल्यावर ताबा घेत हिंसक आंदोलन करणे हा लोकशाहीवर, प्रजासत्ताक दिनावर डाग लावण्याचा कलंक फासण्याचा निषेधार्ह प्रकार दिल्लीत घडला आहे. याची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे. असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द मात्र न्यायालयात हजर राहावं लागणार !
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- आनंदाची बातमी : खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाकरिता ६० टक्के सहभागाची अट शिथिल करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

