जालना : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं जालना ते दादर धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेद दाखल होत आहे. येत्या १४ फ्रेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत सुधारित वेळेनुसार धावणार आहे.
जालना ते मुंबई धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. ही एक्सप्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. जालना येथून जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी क्रमांक ०२२७२ सकाळी ८.३० वाजता निघून औरंगाबादला ९.२० वाजता पोहोचेल. मनमाडला सकाळी ११.२० ला पोहोचेल. नाशिक येथे दुपारी १२.२३, इगतपुरी दुपारी १.१५, कल्याण दुपारी ३.०९ वा. पोहोचेल. त्यानंतर ठाणे दुपारी ३.३१, दादर ३.५८, तर सीएसटीला दुपारी ४.२० वाजता पोहोचेल.
दरम्यान, मुंबईहून येताना छत्रपती शिवाजी टर्मिनसहून गाडी क्रमांक ०२२७१ दुपारी १२.१० वाजता निघेल. नाशिकला दुपारी ३.४४ वा. पोहोचेल. मनमाडला दुपारी ४.५० वाजता, औरंगाबादला सायंकाळी ६.३५ वाजता, तर जालना येथे सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- खिशातील बिड्यांच्या ‘क्लू’मुळे पोलिसांना सापडला मारेकरी
- जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
