मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. कारण ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केले होते. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay Raut) यांनी आज घेतलेल्या परिषदेत पाटलांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच कोणाच्या भरवश्यावर तुम्ही तारख्या देताय?, असा सवालही त्यांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की, मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते वेगवेगळ्या तारखा सांगत आहे. मी त्यांना इतकाच विचारू इच्छितो की ,कोणाच्या भरवश्यावर तुम्ही तारखा देताय?, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी देखील राऊतांनी याविषयी प्रतिक्रिया दिली होती. चंद्रकांत पाटील यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आता १० मार्च नंतर पाच राज्यांच्या निवडणुका येतील मग ते सरकार पडेल. या अगोदर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. मात्र काही झाले नाही. त्यांचे प्रयत्न त्यांनी विविध माध्यमातून सुरु ठेवावे. ईडी , सीबीआय अशा माध्यमांतून त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवावेत, असे राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर; संजय राऊतांचा आरोप
- PMC बँक घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा – संजय राऊत
- “…तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ‘त्या’ दलालाला शिवसेना जोड्याने मारेल”, संजय राऊतांचा इशारा
- “किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल, धमक्या देतो”; संजय राऊत आक्रमक!
- ‘पंतप्रधान दिल्लीत माझं भाषण ऐकत आहेत’ ; संजय राऊत यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

