नाशिक: राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही. याकरिता संसदेत आवाजही उठवला. पण अद्यापही आकडेवारी समोर न आल्याने ओबीसींचे नुकसान झाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काय म्हणाले ते पाहा..
आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जनगणना आवश्यक
महाराष्ट्रात शरद पवारांनी मंडल आयोगाची अमलबजावणी करून ओबीसींना अधिकार मिळवून दिले. या ओबीसी वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत हा प्रश्न मांडून ओबीसी जनगणना करण्यास पाठपुरवा केला. मात्र अद्याप देखील ती आकडेवारी जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे,
आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत तसेच मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भुजबळांनी सांगितलं.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे. ओबीसी आरक्षणाला तसेच इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सर्व पक्षीयांनी मान्य केली आहे. त्यानुसार सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार


